महाराष्ट्र | कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरू मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊननंतर सुमारे आठ महिन्यांनंतर कोरोनाच्या सावटाखाली राज्यातील २२ जिल्ह्...
महाराष्ट्र | कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरू
मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊननंतर सुमारे आठ महिन्यांनंतर कोरोनाच्या सावटाखाली राज्यातील २२ जिल्ह्यांतील शाळांमध्ये सोमवारी पहिल्यांदाच नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरले. अनेक ठिकाणी शिक्षकांनाच कोरोनाची लागण झाल्याने तसेच दुसऱ्या लाटेची भीती यापार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पालकांनी संमतीपत्र भरून दिलेली नाहीत. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची संख्या शाळेत जेमतेमच होती.
मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊननंतर सुमारे आठ महिन्यांनंतर कोरोनाच्या सावटाखाली राज्यातील २२ जिल्ह्यांतील शाळांमध्ये सोमवारी पहिल्यांदाच नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरले. अनेक ठिकाणी शिक्षकांनाच कोरोनाची लागण झाल्याने तसेच दुसऱ्या लाटेची भीती यापार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पालकांनी संमतीपत्र भरून दिलेली नाहीत. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची संख्या शाळेत जेमतेमच होती.
राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला असल्याने पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह मराठवाड्यातील पाच तर विदर्भातील ८ जिल्ह्यात शाळा सुरु आहे. मात्र ३ जिल्ह्यांच्या प्रशानाने तूर्त शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे ३१ डिसेंबर तर पुणे व नागपूर महापालिका क्षेत्रातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाहीत. तर नाशिकसह जळगाव, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होणार आहेत.
दिवाळीमध्ये झालेली प्रचंड गर्दी व गेल्या काही दिवसांपासून वाढणारे कोरोनाचे रूग्ण पाहता, अजून आठ दहा दिवसानंतर कोरोना रूग्णवाढीचा अंदाज घेऊनच लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेतला जाईल. मात्र अद्याप तरी असा कुठलाही विचार नाही.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
"शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा स्थिती वेगळी होती. आता शिक्षणमंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे."
- बच्चू कडू, राज्यमंत्री, शालेय शिक्षण
मुलांना शाळेत पाठवण्यास पालक तयार नाहीत. पालकांमध्ये प्रचंड भीती आहे. त्यामुळे लस येईपर्यंत शाळा सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.