माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा या राष्ट्रीय समितीवर समावेश कराड / प्रतिनिधी : सन 1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युध्दात न...
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा या राष्ट्रीय समितीवर समावेश
कराड / प्रतिनिधी : सन 1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युध्दात निर्माण झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मरणार्थ काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावर काही उपक्रम घेतले जाणार आहेत. त्या उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक समिती गठीत केली आहे. ही समिती माजी संरक्षण मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे. तसेच या समितीमध्ये लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी संरक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह, श्रीमती किरण चौधरी, उत्तम कुमार रेड्डी, मेजर वेद प्रकाश, श्रीमती शर्मिष्ठा मुखर्जी, कॅप्टन प्रवीण डवर आदी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यामधील युध्दात भारताने पाकिस्तानला हरवून भारताने निर्माण केलेल्या बांगलादेश ला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मरणार्थ देशभर उपक्रम घेतले जाणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेवरून ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या स्व इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने पाकिस्तानवर विजय मिळवीत पाकिस्तानचे दोन तुकडे करत सन 1971 मध्ये बांगलादेशाची निर्मिती केली होती. याच घटनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. भारत-पाकिस्तान युध्दात पाकिस्तानला हरवून बांगलादेशची निर्मिती करण्यात आली. हा दिवस 16 डिसेंबरला विजय दिवस म्हणून दरवर्षी देशात साजरा केला जातो. म्हणून या घटनेच्या स्मरणार्थ देशभर काँग्रेस पक्षाकडून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांची रचना व अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन केली आहे. त्याची घोषणा काँग्रेस पक्षाकडून पत्रक प्रसिध्द करून झाली आहे.