... तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे : आ. रोहित पवार निवडणुकीसाठी होणार्या खर्चास फाटा देत गावाचा विकास करा कर्जत/प्रतिनिधी ः ग्रामपंचायत निव...
... तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे : आ. रोहित पवार
निवडणुकीसाठी होणार्या खर्चास फाटा देत गावाचा विकास करा
कर्जत/प्रतिनिधी ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना जर कुणी दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य काही मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कशीच गय केली जाणार नाही. असा कोणताही प्रकार कुणी करू नये अन्यथा, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे ! असा सज्जड दमच आ. रोहित पवार यांनी भरला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते त्यांच्या माध्यमांशी बोलत होते.
’कोरोना महामारीने आणि नैसर्गिक संकटाने अगोदरच आपल्याला खुप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजुला ठेऊन निवडणुकीसाठी होणार्या खर्चास फाटा देत गावच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. आर्थिक खर्च वाचवण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वाद संपुष्टात आणण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना 30 लाखांचा विकासनिधी घ्या, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी कर्जत- जामखेड तालुक्यातील निवडणुक कार्यक्रम लागलेल्या गावांतील नागरिकांना केले आहे. कर्जत तालुक्यातील सुमारे 56 तर जामखेड तालुक्यातील 49 गावांच्या ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आ.रोहित पवारांनी ही घोषणा केली आहे. बिनविरोध निवडणुका पार पाडलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातूनही अधिकचा निधी देण्यात येणार असल्याचे आ. पवार यांनी त्यांच्या माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
बिनविरोध निवडणूक हिताची
ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघते. गावच्या सलोख्यास बाधा पोहोचते आणि गटा-तटाच्या राजकारणात गावचा विकास खुंटतो. सध्याच्या काळात प्रत्येक व्यवसायाला आणि त्यात काम करणार्या नागरिकांना कोरोनाचा फटका बसला आहे.प्रशासनावरही याचा ताण अधिक वाढला आहे.अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांना खुप मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ’बिनविरोध निवडणूक’ ही प्रक्रिया गावच्या हिताची ठरणार असल्याचे आ.रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.