नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाहन धारकांना दिलासा दिला असून फास्टटॅग साठी मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारच...
नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाहन धारकांना दिलासा दिला असून फास्टटॅग साठी मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारचाकी वाहनधारकांना फास्टॅग लावण्यासाठी 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वी प्रत्येक चारचाकी वाहनासाठी 1 जानेवारीपासून फास्टटॅग बंधनकारक असेल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. एक जानेवारीपासून देशातील टोल नाक्यांवर कॅश व्यवहार होणार नाहीत, फक्त फास्टटॅग ग्राह्य धरले जाईल असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केले होते. पण, आता फास्टटॅग साठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी 2021 पासून प्रत्येक चारचाकी वाहनाला फास्टटॅग बंधनकारक असणार आहे.फास्टटॅगची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील.