मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. मात्र यावेळी स्पर्धेत बदल काही बदल करण्यात आले आह...
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. मात्र यावेळी स्पर्धेत बदल काही बदल करण्यात आले आहेत. या परिक्षेला किती वेळा बसावे याची मर्यादा नव्हती. मात्र आता यापुढे खुला वर्गाच्या परिक्षार्थ्यांना केवळ सहा वेळाच अशा परिक्षांना बसता येणार आहे. याची घोषणा आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी नव्या वर्षापासून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परिक्षासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यापूर्वी अशा स्पर्धा परीक्षेस बसण्यास मर्यादा नव्हती. मात्र आता यावर मर्यादा आणण्यात आली आहे. या निर्णयामुळे यापुढे खुला(अराखीव) वर्गातील उमेदवारांस केवळ सहा वेळा अशा परीक्षा देता येणार आहेत. मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ वेळा अशा परीक्षा देता येतील तर अनुसुचित जमाती व अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही. उमेदवाराने पूर्व परिक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परिक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परिक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची ती संधी समजली जाणार आहे. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परिक्षेच्या कोणत्याही टप्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परिक्षेस उपस्थिती ही संधी म्हणून गणली जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाची अंमबजावणी २०२१ मध्ये प्रसिध्द होणा-या जाहिरातीस अनुसरुन आयोजित परिक्षांपासून लागू करण्यात येणार आहे.