सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेणार्...
सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेणार्या सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक सिडींग करण्यासाठी अंतिम मुदत 31 जानेवारी 2021 देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक या मुदतीत लिंक होणार नाहीत त्यांना 1 फेब्रुवारी 2021 पासून सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ घेता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेणार्या सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक सिडींग 100 % पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष मोहिम राबविणेचे निर्देश शासनस्तरावरुन देणेत आलेले आहेत.
लाभार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून रास्तभाव दुकानांतील ई-पॉस मशिनमधील ई-केवायसी व मोबाईल लिंकींग सुविधेचा वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक लिंक करता येणार आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 1679 रास्तभाव दुकानांतून ही व्यवस्था उपलब्ध करुन देणेत आली आहे. त्याबाबतचे प्रशिक्षणही रास्तभाव दुकानदारांना संबंधीत तालुक्याचे पुरवठा शाखेमार्फत देण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात एकूण 18,28,257 लाभार्थ्यांपैकी अद्याप 3,03,262 इतक्या लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले नाही. त्यापैकी जे लाभार्थी दुबार, मयत, स्थलांतरीत आहेत किंवा ज्या मुली विवाहीत असूनही त्यांची नावे मुळच्या शिधापत्रिकेवर तशीच राहिली आहेत. त्यांचेसाठी विशेष मोहिम राबवून त्यांची नावे कमी करण्याची कार्यवाही करण्याच्या सुचना अधिनस्त सर्व तहसिलदार यांना देणेत आल्या आहेत.
केवळ आधार सिडींग न झालेमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये म्हणून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ घेणार्या लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अद्यापही लिंक झाले नाहीत. त्यांनी त्यांचे रास्तभाव दुकानदारांकडे आधारकार्डची छायांकीत प्रत व अंगठा द्यावा व आधार सिडींग त्वरीत करुन घ्यावे, असे आवाहन सिंह यांनी केले आहे.
.....................