सातारा / प्रतिनिधी : कोरोनामुळेच नव्हे, तर अन्य कोणत्याही कारणाने मृत्यू येणं वाईटच. शासनाने कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, अशा शासकीय...
सातारा / प्रतिनिधी : कोरोनामुळेच नव्हे, तर अन्य कोणत्याही कारणाने मृत्यू येणं वाईटच. शासनाने कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, अशा शासकीय कर्मचार्यांकरिता 50 लाखांच्या विम्याची तरतूद केली होती. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेंतर्गत ज्या कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्या नातेवाईकांना 50 लाखांचा धनादेश देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील एका कर्मचार्याच नातेवाईकांना हा धनादेश प्रदान करण्यात आला. शासनाने कोरोना बाधित झालेल्या रुग्णांसाठी औषधोपचाराची सुविधा केली होती. ज्या शासकीय कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील पहिल्या कुटुंबास तशा प्रकारची मदत नुकतीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या सहकार्याने 50 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यालयातून देण्यात आली.