कराड / प्रतिनिधी : मलकापूरच्या आगाशिवनगर मधील ख्रिस्ती दफनभूमीस सरंक्षक भिंत बांधण्यासाठी नगरपरिषदेने निधी उपलब्ध करुन द्यावा व दफनभूमीवर ...
कराड / प्रतिनिधी : मलकापूरच्या आगाशिवनगर मधील ख्रिस्ती दफनभूमीस सरंक्षक भिंत बांधण्यासाठी नगरपरिषदेने निधी उपलब्ध करुन द्यावा व दफनभूमीवर झालेली अतिक्रमणे प्रशासनाने तातडीने काढून टाकावीत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ख्रिस्ती समाजाच्या वतीने येथिल विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
मलकापूर नगरपरिषद हद्दीतील आगाशिवनगर
येथील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीची प्रचंड दुरावस्था झाले आहे.या ठिकाणी झोपडपट्यांची अतिक्रमण झाली असून दफनभूमीच्या विविध समस्यांवर वेळोवेळी मागणी करूनही नगरपंचायतीसह लोकप्रतिनिधी ही दुर्लक्ष करीत आहेत.दफन भूमी बाबतच्या समाजाच्या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ख्रिस्ती युवा शक्ती महाराष्ट्र, ब्लेसिंग युथ व समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
ख्रिस्ती युवा शक्तीचे अध्यक्ष राकेश सावंत म्हणाले, आगाशिवनगर येथे ख्रिस्ती समाजाला राज्याचे पहिले मूख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यामूळे 84 गूंठे जागा दफन भूमीसाठी मिळाली आहे. या दफनभूमीवर अतिक्रमण व इतर समस्या बाबत समाजाच्या वतीने नगरपरिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे. दफनभूमीस संरक्षक भिंत नसल्यामुळे याठिकाणी झोपड्यांची अतिक्रमणे करण्यात आली आहेत. दफनभूमीतील अनेक कबरींची तोडफोडही करण्यात आली आहे. तसेच दफनभूमीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
गेली अनेक वर्षापासून ख्रिस्ती समाज दफनभूमीतील समस्यांसाठी पाठपूरावा करीत आहे. मात्र, सत्ताधारी टोलवा टोलवीचे उत्तरे देत आहे. आमदार असो अथवा नगराध्यक्ष तसेच अनेक लोकप्रतिनिधींना समस्यां बाबत भेटून सूध्दा या अडचणी अनेक वर्षापासून रखडत ठेवल्या आहेत. दफनभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात येत असून समाजाच्या जमीनी बळकवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे गणेश ननावरे यांनी सांगितले.
दफनभूमीत असणार्या कबरींची तोडफोड केली जात असून तेथे असलेले लोखंडी फलक व तारेचे कूंपन ही चोरुन नेण्यात आले आहे. तेथील अज्ञात लोकांचा खूप त्रास व समस्या उदभवत आहेत. दफन भूमीत सांडपाणी सोडले जात असून त्या सांडपाण्याला पर्याय व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी असून दफनभूमी बाबतच्या समाजाच्या मागण्या, अडचणी, त्रास त्वरीत दूर कराव्यात अन्यथा होणार्या आंदोलनास समोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी ख्रिस्ती युवा शक्तीचे महाराष्ट्र अध्यक्ष राकेश सावंत, कार्याध्यक्ष गणेश ननावरे, अतूल घाटगे, ख्रिस्ती धर्मगूरू पौल वायदंडे, संतोष वाडते, सुशील चोपडे, अनिल महापूरे, दिनेश शिंदे, संतोष करडे, योहान मेंगे, सुरेश लोंढे, राजन भोरे उपस्थित होते.