मंचर/प्रतिनिधीः जुने आंबेगाव गावठाण येथील 26 कातकरी आदिम जमातीचे बांधव डिंभे धरणातील बुडीत जागेवर बांधलेल्या घराक्या नोंदी करून त्यांना ग्...
मंचर/प्रतिनिधीः जुने आंबेगाव गावठाण येथील 26 कातकरी आदिम जमातीचे बांधव डिंभे धरणातील बुडीत जागेवर बांधलेल्या घराक्या नोंदी करून त्यांना ग्रामपंचायतीत समाविष्ट करावे, या मागणीसाठी व सांविधानिक हक्कांसाठी 26 जानेवारीपासून उपोषणास बसले आहेत. तिसर्या दिवशीही उपोषण सुरू आहे. दुपारी एक महिलेला चक्कर आली होती. एकूण दहा जण उपोषणास बसले आहेत.
सन 2011 च्या जनगणनेनुसार बुडीत आंबेगाव येथील शिल्लक क्षे
त्र सुमारे 10 हेक्टरच्या आसपास असून 26 निवासी घरे आहेत. याठिकाणी मुख्यतः आदिम जमाती कातकरी समाजाचे वास्तव्य आहे; परंतु कातकरी समाजाच्या घरांची नोंद कोणत्याच ग्रामपंचायतीला न झाल्यामुळे त्यांना कोणत्याही नागरी सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत. यासाठी ग्रामस्थ, शाश्वत संस्था व किसान सभा सतत पाठपुरावा करत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून आंबेगाव पंचायत समितीने परिपूर्ण प्रस्ताव पुणे जिल्हा परिषदेला पाठवला. जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव मान्य करून व आवश्यक त्या ठरावासह तो विभागीय आयुक्तांकडे तीन वर्षांपूर्वीच पाठविला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने 20 डिसेंबर 2017 रोजी हा प्रस्ताव मान्यतेसाठी ग्रामविकास विभागाकडे पाठवला होता. 2018 या प्रस्तावात त्रुटी काढून हा प्रस्ताव पुन्हा पाठवला होता; परंतु या त्रुटींची 2018 पासून जिल्हा प्रशासनाने कोणतीच पूर्तता केली नाही. त्यामुळे या प्रस्तावावर अदयाप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर हा प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा, डिंभे धरणाचे बुडित आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र लगतच्या ग्रामपंचायतला जोडण्यात यावे किंवा त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, अशा मागण्या किसान सभेने विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. हा प्रश्न सुटण्यासाठी शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी व स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.