मुंबई : महाराष्ट्रात सध्या शहराच्या नामांतरावरुन वादंग पेटले आहे. नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. यावर...
मुंबई : महाराष्ट्रात सध्या शहराच्या नामांतरावरुन वादंग पेटले आहे. नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला . शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, अशी टीका मिटकरींनी भाजपवर केली आहे. भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मिटकरींनी प्रत्युत्तर दिले आहे.
गुजरातची सत्ता किती काळ भाजपजवळ आहे?, एवढ्या दिवसात अहमदाबादच नाव का बदललं नाही?, असा सवाल करत भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं मिटकरी म्हणाले. 1990 आणि 2001 मध्ये भाजपने घोषणा केली होती की आमची सत्ता आल्यावर अहमदाबाद शहराचं नाव बदलू तिथं कित्येक वर्षे तुमचंच सरकार आहे, मग आजून अहमदाबादचे नाव कर्णावती का झालं नाही?असा सवाल त्यांनी उपस्थित केला . तर भाजपच्या काळात कर्णावती झालं नाही तर गुजरातची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात द्या, दुस-याच दिवशी कर्नावती नाव आम्ही करुन दाखवू, असेही मिटकरी म्हणाले. दरम्यान महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीला टार्गेट करण्याच शडयंत्र भाजप रचत आहे, असा आरोप यावेळी मिटकरी यांनी केला. भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एवढीच जर धमक असेल तर त्यांनी अहमदाबादच्या नामांवराविषयी मोदींशी बोलावे , असे मिटकरी म्हणाले.