मुंबई : राज्यातून गायब झालेल्या थंडीचे संक्रांतीदरम्यान पुन्हा एकदा आगमन होणार आहे. ढगाळ स्थिती निवळल्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे...
मुंबई : राज्यातून गायब झालेल्या थंडीचे संक्रांतीदरम्यान पुन्हा एकदा आगमन होणार आहे. ढगाळ स्थिती निवळल्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ही शक्यता व्यक्त केली. अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यातील किमान तापमानात लक्षणीय वाढ होऊन थंडी पूर्णपणे गायब झाली होती. उत्तरेकडील काही राज्यांमध्ये एक-दोन दिवसांत थंडीची लाट येणार आहे. उत्तरेकडील काही राज्यांमध्ये एक-दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीटी लाट येण्याची शक्यता आहे.