मुंबई : भाजपवर दररोज जहरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा मकरसंक्रातीच्या दिवशी भाजपसोबतचे कडू संबध संपवून गोड संबध सुरू करण्याचे संक...
मुंबई : भाजपवर दररोज जहरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा मकरसंक्रातीच्या दिवशी भाजपसोबतचे कडू संबध संपवून गोड संबध सुरू करण्याचे संकेत तर दिले नाही ना, असे संकेत राऊत यांच्या प्रतिक्रियेवरुन दिसून येत आहे. मी भाजपला विरोधी पक्षच मानत नाही, ते आमचे सहकारीच आहेत.
मुळात राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो आम्ही भाजपसोबत 25 वर्षे जवळून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी शत्रुत्व असण्याचं कारण नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. आहे. तुम्ही विरोधी पक्षाला मकरसंक्रांतीच्या काय शुभेच्छा द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत प्रत्युत्तर दिले. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. भाजपा सोबत आम्ही पंचवीस वर्ष काम केले आहे. आम्ही त्यांना शत्रू मानायला तयार नाही. जरी विरोधी पक्षात असले तरी ते आमचेच सहकारी आहे. मकरसंक्रांतींच्या दिवशी मी एवढीच अपेक्षा करतो की, विरोधी पक्षातील सहकार्यांनी आमच्याशी गोड बोलावं, गोड राहावं, गोड हसावं. त्यांनी सरकारबाबात सकारात्मक विचार करावा, एवढ्याच शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.