सांगली /प्रतिनिधी : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली. स्वा...
सांगली /प्रतिनिधी : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 25 जानेवारीपासून राज्यात एफआरपीच्या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. याच मोर्चाला खोत यांनी लक्ष्य केले. शेट्टी कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आता ते चोरांच्या आळंदीला पोहोचलेत, अशी टीका सदाभाऊंनी केली खोत म्हणाले, की काही मंडळी साखर कारखान्याच्या मांडीला मांडी लावून बसली आहेत. अशी मंडळी लोकांना दाखवण्यासाठी साखर कारखानदारांच्या विरोधात नाटकी आंदोलन करत आहेत. ते सरकारमध्ये आहेत. त्यांनी आंदोलन करण्याऐवजी ऊस शेतकर्यांना न्याय द्यावा. ते जमत नसेल तर सरकारमधून बाहेर पडावे. एकाबाजूला सरकारमध्ये राहून दोन्ही हात तुपात ठेवयाचे आणि दुसर्या बाजूला लोकांना दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे. आता ते चोराच्या आळंदीला पोहचले आहेत. त्यांनी आता नाटके बंद करावीत, अशी अप्रत्यक्ष टीका खोत यांनी केली.