मुंबई : प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिसांचारावरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणातून नार...
मुंबई : प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिसांचारावरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणातून नाराजी व्यक्त केली. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून राष्ट्रपतींना काही सवाल केले आहेत. यामध्ये आंबेडकर म्हणतात, आदरणीय राष्ट्रपती महोदय, प्रचंड दुःख आणि खेदाने आपल्याला याची आठवण करून देणं आवश्यक आहे की, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्याला राष्ट्रपती बनवलं आहे, त्यांना 1949 मध्ये सरदार पटेल यांना लिहून द्यावं लागलं होतं की, ते तिरंग्याचा अपमान करणार नाही आणि 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला कार्यालयात तिरंगा ध्वज फडकवू. संघानं तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. आपण ही गोष्ट विसरून गेला आहात का? आंदोलक शेतकर्यांनी तिरंगा खाली उतरवला नाही. तर तिरंग्याच्या उंचीपासून 15 फूट खाली शीख धर्माचा आणि शेतकर्यांचा झेंडा लावला, यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर ठडडने 15 ऑगस्ट 1947 साली काळा दिवस साजरा केला होता. त्यांची निंदा, निषेध का करत नाही करत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे केलेल्या भाषणात नव्या कृषी कायद्यांचे समर्थन करताना, या कायद्यांमुळे लहान शेतकर्यांना लाभ मिळून लागल्याचे म्हटलं होतं. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचाराचा आणि राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा ‘अतिशय दुर्देवी’ अशा शब्दांत त्यांनी निषेध केला होता. जर संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असेल तर त्याचा वापर कायदा आणि नियम पाळून गांभीर्याने करणे अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले होते.