शेंद्रे / वार्ताहर : कारखान्याची वाटचाल ही सदैव प्रगतीच्या दिशेने असल्याने व कारखान्याचे संचालक मंडळाचे सभासदाभिमुख धोरण असल्यामुळे याचा लाभ...
शेंद्रे / वार्ताहर : कारखान्याची वाटचाल ही सदैव प्रगतीच्या दिशेने असल्याने व कारखान्याचे संचालक मंडळाचे सभासदाभिमुख धोरण असल्यामुळे याचा लाभ ऊस उत्पादक शेतकर्यांना होत असल्याने तसेच ऊस उत्पादक शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून दर 10 दिवसांचे ऊस पेमेंट आदा होत असल्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळालेला असून आनंदाचे वातावरण आहे. यास्तव शेतकरी संघटनेचे नेते महाराष्ट्र किसान मंच कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष श्रीमती संगिता मोडक, सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव, सातारा युवा जिल्हा अध्यक्ष शिवाजी कोळेकर, पाटण तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सातारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती पुनम गायकवाड, कराड तालुका अध्यक्ष यासिन पटेल, हवेली तालुका अध्यक्ष सौ. चैत्राली कोलते, सातारा महिला आघाडी सौ. प्रेमिला कोलते पाटील, मायणी अर्बन बँक व्हाईस चेअरमन नवनाथ फडतरे, काटेवाडीचे बजरंग कचरे, खंडाळा तालुका अध्यक्ष रविंद्र ढमाळ, कराडचे प्रमोद माने, सातारा कोरेगाव सोपानराव कदम यांनी कारखाना स्थळावर येऊन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव दिनकरराव सावंत, व्हाईस चेअरमन विश्वास रामचंद्र शेडगे यांच्यासह संचालक मंडळाच्या सदस्यांसह कार्यकारी संचालक संजीव देसाई यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सभासद ऊस उत्पादक शेतकर्यांकडून व आपणा सर्वांकडून सदोदित हार्दिक सहकार्य मिळत असून संचालक मंडळाची दूरदृष्टी आणि कारखान्याचे पारदर्शक कारभारामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता ठेवणे मला शक्य होत आहे. म्हणूनच जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही आपले अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज उल्लेखनिय व आदर्शवत आहे. स्व. भाऊसाहेब महाराज यांचे आदर्श विचार डोळयासमोर ठेऊन सभासद शेतकरी यांना कारखान्याचा केंद्रबिंदू मानून सभासदांच्या विश्र्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेत संचालक मंडळाने काटकसरीचे धोरण अवलंबवून साखर उद्योग अडचणीत असतानाही कारखान्याचे संचालक मंडळ कुशलतेने काम करीत आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांनी घेतलेल्या पीक कर्जावरील व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही याकरिता अजिंक्यतारा कारखान्याने मागील हंगामाप्रमाणे याही चालू गाळप हंगामात ऊसाचे दर 10 दिवसांचे पेमेंट करत आहे. महाराष्ट्र राज्याच्या साखर उद्योगामध्ये अशा पध्दतीने दर 10 दिवसांनी ऊस पेमेंट आदा करणारा अजिंक्यतारा हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आहे. केंद्र शासनाचे एफआरपी सूत्रानुसार चालू गळीत हंगामाकरिता एफआरपी प्रति मे.टन रूपये 3043.00 इतकी असून या हंगामात गाळपास येणार्या ऊसास पहिली उचल प्रति मे. टन रूपये 2600.00 प्रमाणे ऊस पेमेंट शेतकर्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात येत आहे. 80 दिवसांमध्ये 82 कोटी 61 लक्ष 42 हजार 741 रकमेचे ऊस बिल पेमेंट संबंधीत शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
23-7
..................