नाशिकः मुंबईहून शिर्डीकडे दुचाकीवरून येताना शनिवारी (दि.2) मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान नाशिक येथील लेखानगर परिसरातील मुंबई-आग्रा महा...
नाशिकः मुंबईहून शिर्डीकडे दुचाकीवरून येताना शनिवारी (दि.2) मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान नाशिक येथील लेखानगर परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत तीन साईभक्तांचा मृत्यू झाला असून, एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विलेपार्ले, मुंबई येथील सिद्धार्थ
भगवान भालेराव (22), वैजनाथ जालिंदर चव्हाण (21), आशिष महादेव पाटोळे (19) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अनिश अरूण वाकळे (17) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून शिर्डी येथे दुचाकीवरून काही युवक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येत होते. लेखानगर येथून उड्डाणपुलावरून ते जात होते. नीलेश नंदकिशोर धावडे, सिद्धार्थ भगवान भालेराव, वैजनाथ जालिंदर चव्हाण, आशिष महादेव पाटोळे व अनिश अरूण वाकळे यांचेसह त्यांचे मित्र दूचाकीवरून शिर्डीकडे येत होते. नीलेश आणि त्याचा मित्र सिद्धार्थ हे दुचाकी(एचएच 02- एफ एच-0610)वरून येत होते, तर आशिष, अनिश व वैजनाथ हे दुसर्या दुचाकी(एमएच-02-एफडी-4248)वरुन येत होते.