नवीदिल्ली : देशातील लोकांच्या मनात लोकशाहीचा विचार रुजला आहे. त्यामुळे लोकशाहीविरोधात वागणार्या कुठल्याही शक्तीला देशातील जनतेने सोडलेले ना...
नवीदिल्ली : देशातील लोकांच्या मनात लोकशाहीचा विचार रुजला आहे. त्यामुळे लोकशाहीविरोधात वागणार्या कुठल्याही शक्तीला देशातील जनतेने सोडलेले नाही, त्यांना धडा शिकवला आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी दिला आहे. देशातील एकूण राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही सूचक विधानेही केली आहेत.
पवार म्हणाले, की आणीबाणीच्या काळात देशातील लोकशाहीच्या बाजूने भूमिका घेणार्या हजारो लोकांना अटक करण्यात आली. यामुळे एक अजब स्थिती देशासमोर उभी राहिली. देशातील जनेच्या मनात लोकशाहीबाबत श्रद्धा आहे. त्यामुळे आणीबाणीनंतर लोकांना संधी मिळाली, तर त्यांनी लोकशाहीविरोधात वागणारी कोणतीही शक्ती असो त्यांना धडा शिकवला. इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी सत्तेपासून दूर ठेवले. कारण लोकशाहीविरोधात छेडछाड करण्याची त्यांची तयारी नव्हती. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून समाजवादी विचारांची शक्ती समोर आली. त्यानंतर या विचारांवर चालणारे लाखो लोक पुढील अनेक वर्षात तयार झाले. देशाच्या हितासाठी त्यांनी काम केले, असे ते म्हणाले. दरम्यान, समाजवादी विचाराच्या कामगार संघटनाही देशभरात निर्माण झाल्या, अशा शब्दांत पवार यांनी समाजवादी विचारांचा पुरस्कार केला.