मुंबई/प्रतिनिधी: राज्यातील महाविद्यालये उद्या म्हणजे 15 तारखेपासून सुरू होणार आहेत; मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये उद्या सुरू होणार ...
मुंबई/प्रतिनिधी: राज्यातील महाविद्यालये उद्या म्हणजे 15 तारखेपासून सुरू होणार आहेत; मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये उद्या सुरू होणार नाहीत. महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 22 फेब्रुवारीपर्यत विचार होणार आहे. विद्यापीठ, महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय जरी राज्य सरकारने घेतला असला, तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय देणार आहे, असे शासन निर्णयात नमूद आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून 22 फेब्रुवारीपर्यत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊन सूचना देऊ आणि त्यानंतर मुंबईतील महाविद्यालये कधी सुरू करता येतील यावर निर्णय घेऊ असे सांगण्यात आले आहे.
कोरोनाची नेमकी परिस्थिती कशी आहे, याचा आढावा, सर्व्हेक्षण करून स्थानिक प्रशासन महाविद्यालये सुरू करण्याबाबत सूचना देईल, असे या पत्रात आयुक्तांकडून सांगितले आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्या वसई विरार, पनवेल, पालघर या क्षेत्रात महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने परावनगी दिल्यानंतर या भागातील महाविद्यालये उद्या राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचा पालन करत सुरू होणार आहेत, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील स्थानिक प्रशासनाने अद्याप महाविद्यालय सुरू करण्याबाबत कळवले नसल्याची माहिती आहे.