मुंबई/प्रतिनिधी : बीडीडी चाळीतील तीनशे रहिवाशांसाठी म्हाडाची लॉटरी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते काढण्यात आली. या वेळी पर्...
मुंबई/प्रतिनिधी : बीडीडी चाळीतील तीनशे रहिवाशांसाठी म्हाडाची लॉटरी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते काढण्यात आली. या वेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते. बीडीडी चाळी
तील रहिवाशांसाठी काढलेल्या लॉटरीबद्दल ठाकरे यांनी आव्हाड यांच्या गृहनिर्माण खात्याचे कौतुक केले.
बीडीडी चाळीबद्दल ऐकत होतो, की विकास होणार; पण महाविकास आघाडी सरकार येईपर्यंत तसे काही झाले नाही. आमचे सरकार आल्यावर हे झाले. आव्हाड यांच्या गृहनिर्माण खात्याने मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेतल्या आणि हा प्रश्न मार्गी लावला, असे ते म्हणाले. एक जानेवारी 2021 पर्यंतचे बीडीडी चाळीतील सर्व रहिवासी पात्र ठरावेत, या पद्धतीने सरकारचे काम चालू आहे. सरकार एक विश्वासाचे वातावरण निर्माण करू इच्छित आहे. आम्ही घर नंबर दिला आहे. त्या घर नंबरवर संबंधित व्यक्तीच्या नावाने अॅग्रिमेंट होईल. हे अॅग्रिमेंट सरकार आणि संबंधित व्यक्तीच्या नावाने असेल. त्यामुळे अविश्वासाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले. साधारण दोन अडीच वर्षात घरे तयार होतील, असा दावाही त्यांनी या वेळी केला. विकास प्रकल्पांना कुणाचा विरोध आहे, तो विरोध कशासाठी आहे, हे सर्व बाजूला ठेवून लोकांचा राज्य सरकारवर विश्वास बसला आहे. पुढे फक्त मुंबईत नाही, तर हाऊसिंग खाते पूर्ण पॉलिसी बनवत आहे. येत्या काळात चित्र बदललेले असेल, असा दावा ठाकरे यांनी केला. त्याचबरोबर मुंबईतील महत्वाचे रस्ते अपग्रेड करणार आहोत. या रस्त्यांवरुन फक्त गाड्या नाही, तर सायकलिंग आणि चालताही यावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.