मुंबई/प्रतिनिधी: वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे यांना न्यायालयाकडून जामीर मंजूर झाल...
मुंबई/प्रतिनिधी: वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे यांना न्यायालयाकडून जामीर मंजूर झाला आहे. 2014च्या वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी आज वाशी न्यायालयात राज सुनावणीसाठी हजर राहिले होते. त्या वेळी न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
2014 वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. राज आज नवी मुंबईतील वाशी न्याालयात हजर होते. अमित ठाकरेही त्यांच्या सोबत होते. राज यांनी जामिनासाठी अर्ज सादर केला होता. तो न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. 26 जानेवारी 2014 ला राज ठाकरे यांनी वाशी येथे केलेल्या भाषणात टोल नाके बंद करण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्याची तोडफोड केली होती. प्रक्षोभक भाषण केल्याने राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांच्या विरोधात वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर राज यांना समन्स देण्यात आला होता. त्यांना सुनावणीसाठी आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आज राज न्यायालयात हजर राहिल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीनअर्जावर सुनावणी झाली. यावेळी 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.