कोपरगाव प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दादासाहेब गलांडे यांच्या साखरपेरणी कवितासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी ज्येष्ठ ...
कोपरगाव प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दादासाहेब गलांडे यांच्या साखरपेरणी कवितासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक मन्साराम पाटील, डॉ. शिवाजी काळे, सुधीर कोयटे, डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. दादासाहेब गलांडे, पत्रकार प्रकाश कुलथे, बाळासाहेब भांड, हेमचंद्र भवर उपस्थित होते.
डॉ. दादासाहेब गलांडे यांच्या साखरपेरणी कवितासंग्रहातून मानवी प्रेमाचा गोडवा आणि ग्रामजीवनातील सुधारणाशील मानसिकतेचा प्रत्यय येतो, असे मत महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी व्यक्त केले. कोपरगाव येथील गलांडे हॉलमध्ये आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश कुलथे बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामीण साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये होते. संयोजक हेमचंद्र भवर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. कवी डॉ. दादासाहेब गलांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून सर्व मान्यवरांचा सन्मान केला.प्रकाश कुलथे पुढे म्हणाले, डॉ. दादासाहेब गलांडे यांनी बहुविध स्वरूपाची साहित्य निर्मिती करून कोपरगाव हे नाव साहित्यक्षेत्रात सर्वत्र प्रतिष्टीत केले. अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले साखरपेरणी नावाप्रमाणे गोड असून मन्साराम पाटील. अविनाश पाटील. सुधीर कोयटे, डॉ. दादासाहेब गलांडे, हेमचंद्र भवर आहे गुणी साहित्यिकांमुळे कोपरगावची साहित्यिक श्रीमंती वाढली आहे. हा कवितासंग्रह प्रबोधन करणारा असून त्यातून कोपरगाव पंचक्रोशीचे चित्र पाहण्यास मिळते असे मत व्यक्त केले. डॉ. शिवाजी काळे, पत्रकार बाळासाहेब भांड यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ. गलांडे यांनी आभार मानले.