जळगावः शेतकर्यांच्या वीजबिल माफीवरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. चाळीसगाव येथील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी संतप्त शेतकर्यांसह जळगाव ...
जळगावः शेतकर्यांच्या वीजबिल माफीवरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. चाळीसगाव येथील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी संतप्त शेतकर्यांसह जळगाव येथील अधीक्षक कार्यालयात तुफान राडा घातला. त्यांनी थेट अधीक्षक अभियंत्याला खुर्चीला बांधले. या प्रकरणी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही शेतकर्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.