कोपरगाव शहर प्रतिनिधी- विजय कापसे: विधानसभा अधिवेशनात कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नका असे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांचा ...
कोपरगाव शहर प्रतिनिधी- विजय कापसे: विधानसभा अधिवेशनात कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नका असे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांचा आदेश असतांनाही कोपरगाव मतदारसंघात अनेक ठिकाणी वीजवितरण कर्मचारी हे शेतकरी बांधवांची पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तात्काळ शासन आदेश मान्य करून विजवितरणाने कृषी पंपाचे विज कनेक्शन तोडणे थांबवावे अन्यथा शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल अशी प्रतिक्रिया अहमदनगर जिल्हा सह.बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ज्या शेतकरी बांधवांची वीज बिल देयके थकीत आहेत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम विज
वितरण कंपनी करत असल्याने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वीज कनेक्शन तोडणी संदर्भात विधानसभेत सरकारला धारेवर धरत वीज कनेक्शन तोडणीमुळे शेतकरी बांधव, उद्योग व्यवसायिक आणि सामान्य नागरिकांचे होणारे नुकसान व समस्या यांच्यावर तात्काळ निर्णय घ्या आणि वीज कनेक्शन तोडणे त्वरीत थांबवा अशी भूमिका घेत शासनाला कोंडीत पकडून अखेर निर्णय घेण्यास भाग पाडुन ज्यांचे या पूर्वी वीज कनेक्शन तोडले आहे त्यांचेही पूर्ववत करा अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली.
जगासह देशावर कोरोना माहमारीचे संकट असतांना आमचा शेतकरी राजा आर्थिक दृष्टीने खचुन गेलेला असतांना उभारी देण्याऐवजी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम ही कंपनी करत आहे.
कोरोना कालखंडात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेती मालाला कवडीमोल विकण्याची वेळ आली त्यातच विजवितरणाने वाढीव वीजबिले आकारली आहेत. शेतकरी बांधवांचे कृषी पंपाचे कनेक्शन तोडु नये यासाठी माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी वारंवार आवाज उठवला आहे व शासनाला पत्रव्यवहार करत या समस्येबाबत पाठपुरावा केलेला आहे.
मात्र शासन निर्णयानंतरही जो पर्यंत वीजबिल भरले जाणार नाही तो पर्यंत वीज कनेक्शन जोडले जाणार नाही अशी भूमिका वीज वितरण कंपनी ब-याच ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फारमोठी हेळसांड होत असुन
एका बाजूला शासनाने घेतलेल्या भूमिकेला विजवितरण कंपनीकडुन आदेशाची अमलबजावणी होत नाही याची शासनाने
गांभीर्याने दखल घ्यावी.तसेच शासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी व कुणाचेही वीज कनेक्शन तोडले जाणार नाही याची दखल घ्यावी,अन्यथा शेतकरी बांधवांसाठी आक्रमक पवित्रा घेऊ अशी परखड भूमिका विवेक कोल्हे यांनी मांडली पञकारांशी बोलतांना मांडली.